Friday, November 18, 2016

लेखणी

आपण आपल्या हातून आपलं भविष्य घडवतो की so called देव आपल्या कडून ते घडवुन घेतो, हा नेहेमीचा वादाचा मुद्दा. मी आस्तिक-नास्तिक या वादात पडणार नाही. पण काही लोकांचं असं स्पष्ट मत असतं की जे काही घडतं ते आपल्या कर्मा मुळे, आपल्या परिश्रमामुळे, आपल्या चुकांमुळे, आपल्या निर्णयांमुळे. त्या मुळे जे चांगलं-वाईट आहे त्याची जवाबदारी ते स्वतः वर घेतात. या उलट काही लोकांचं असं मत असतं की आपण कितीही, काहीही केलं तरीही देवाच्या इच्छे पुढे काहिच होत नाही. बहुतेक त्यालाच नशीब असं ही म्हणता येईल. मला दोनही मतं पटतात, पण तरीही मनाचा जास्त कौल हा देवाकडेच जास्त झुकतो. मी प्रामाणिक प्रयत्नांना नाकारतो असं नाही पण, मला असं अगदी ठाम वाटत की, प्रामाणिक प्रयत्न आणि प्रचंड इच्छाशक्ती  असेल तर देव / नशीब नेहेमीच तुमच्या सोबत असतं. किंबहुना प्रचंड इच्छाशक्ती असेल तर देवच किवा नियतीच तुमच्या कडून ते घडवून घेते. त्यावेळी तुम्ही फक्त एक निमित्त मात्र उरता. पण यश मिळवल्यावर आपण  हे विसरतो आणि तत्काळ 'आपणच' किवा 'मीच' ते कसं मिळवलं हे सांगत सुटतो. त्यात नियतीचा पण हातभार होता याचा विसर आपल्याला पडतो. याच विचाराला अनुसरून हि कविता सुचलेली आहे.

लेखणी


का मज वाटे ऐसे की मीस्वतःचपळतो आहे
दिसताच दिशा अनेक मी अचूक वळतो आहे
का मज वाटे ऐसे की तपस्यामीकरता खूप
अशक्यप्राय यशाचे मग दिसते मजला रूप
का मज वाटे ऐसे की सर्व मिळवलेमीच
प्राप्तीस माझ्या कारणीभूत नाही दुसरे कुणीच
का मज नाही कळत कीमीफक्तलेखणीतयाची
कथेत लिहिल्या जाईल तेच जे येईलत्याच्यामनाशी


सारंग कुसरे

No comments:

Post a Comment