Wednesday, December 2, 2015

बोल अन मौन

असा एक general समज आहे आपल्यात की खुप बोलणारे लोकं generally एक तर पाचकळ, पांचट, अक्कल्शुन्य किवा तद्धन मुर्ख असतात. आणि त्या उलट खुप कमी बोलणारे म्हणजे so-called विद्वान, विचारी, हुशार असतात. नाही विचार करून बोलायला आपली काही ना नाही in-fact कितिही बोललं तरीही ते विचार करूनच असलं पाहिजे यात काही वाद नाही. पण overall जर बघायला गेलं तर मौनाला भाषेपेक्षा / बोलण्यापेक्षा जास्तच महत्व दिलं जातं, जास्त प्रशस्त समजलं जातं. नाही, मौनाचं श्रेष्टत्वं कुणीही नाकारत नाही पण फक्त त्याच्या वापराबद्दल आणि त्याचा आसरा घेऊन शहाणपणाचं पांघरूण ओढ्ण्याबद्दल आक्षेप आहे. त्याच विषयावरची ही कविता आहे.

बोल अन मौन

मूर्ख एकची करतो बडबड
व्यर्थ लोकांची चाले धडपड
कोण मूर्ख अन कोण शहाणा
मूर्खपणाला नसतो बहाणा
मौनाचे वौंशी शहाणेच असतात
असे मानणारे हमखास फसतात
टोचू शकते बोल अन मौन
दोनीही वापरावे सांभाळून



सारंग कुसरे  

No comments:

Post a Comment